रविवार, २१ जानेवारी, २०२४

माणूस म्हणून जगण्याचा संघर्ष !




    महाराष्ट्र माझी माय भूमी, या महाराष्ट्राच्या मातीने मला कष्ट करायला शिकवले. सत्याची कास धरून वागायला शिकवले. समानता शिकवली. माणुसकी शिकवली. शिव, फुले ,शाहू ,आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श मला इथूनच मिळाला. पण आजकाल माझा जीव घुसमटतोय. प्रबोधनाची परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील एक तरूण आज विचारांच्या लढाईत थंड पडतोय. या महापुरुषांच्या विचारांनी मला स्वातंत्र्य, समता, बंधुता व लोकशाही या मूल्यांना धरून आयुष्य जगण्याची प्रेरणा दिली. धर्म,  जात, पंथ व भाषा यांच्या बेड्या तोडून मला एक माणूस म्हणून जगण्याचा विचार दिला. पण आजकाल जे आजूबाजूला वातावरण बघतोय.  की येवढा कसा हा उच्च निच्च पणा शाळेतील शिक्षक असा प्रश्न विचारतात की तुमची जात कोणती आहे. तुम्ही हलक्या जातींचे की वरच्या जातींचे त्यावरून ते ठरवणार की समोरच्याशी कसं बोलायचं. धर्म हा तर लोकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला दिसतोय. त्यांना दुसरं काहीच दिसत नाही. फक्त आणि फक्त धर्म वाचवायचा. आणि हे प्रमाण सर्वात जास्त तरूण पिढीतील युवक आणि युवती मध्ये बघायला मिळतंय. चांगलं शिक्षण,  आरोग्य यांची कोणालाच काही पडली नाही असं सगळं वातावरण या समाजात निर्माण होताना दिसतंय. कालांतराने असं वाटतयं की धर्मच हा यांना सगळ्या काही जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करेल. एकमेकांकडे बघण्याची दृष्टी बदलायला लागली आहे. जातिव्यवस्था हजारों लाखों वर्षांपासून समाजाच्या मानगुटीवर बसलेली आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात

भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.!

बाबासाहेबांचा हा विचार अजुन पण तेवढाच खरा ठरतोय. अजुन सुध्दा जातीच्या नावावर एकमेकांना उच्च तुच्छ लेखणे कमी झालेलं नाही.देशात सर्वात जास्त या जाती व्यवस्थेमुळे लोक एकमेकांपासून दूर गेले. आणि हा देश एकसंघ झाला नाही. इंग्रजांनी सुध्दा फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. कारण त्यांना माहित होते. की हे लोक जातीच्या - धर्माच्या नावावर एकमेकांचा जीव घ्यायला पण कमी करणार नाहीत. आणि यांचा फायदा त्यांना झाला. तब्बल दीडशे वर्षं इंग्रजांनी देशावर राज्य केलें. का तर आपला समाज हा जातिव्यवस्थेच्या विलाख्खात अडकलेला आहे. पण ही जातीव्यवस्था अजुन पण संपलेली नाही. दररोजच्या जीवनात जगत असताना ह्या जातींचा उल्लेख झाल्याशिवाय माणूस राहत नाही.शिक्षणा पेक्षा धर्म श्रेष्ठ झालायं. मला कोणाच्याही श्रध्देचा अवमान अजिबात करायचा नाही. पण देशात जे वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे खरंच विचार येतोय. असंच सुरू राहिलं तर देश अजुन किती मागे जाईल. भोळ्या भाबड्या लोकांच्या भावनांचा वापर करून देशांची शिक्षणव्यवस्था हे राजकारणी मातीत तर घालणार नाही ना यांचा विचार येतोय. हा माणूस म्हणून जगण्याचा संघर्ष कधी थांबेल. एकमेकांना माणूस म्हणून बघण्याची दृष्टी या समाजात कधी निर्माण होईल. आणि माझा देश खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष कधी होईल.!

सोमवार, २६ डिसेंबर, २०२२

प्रिय निसर्गा


प्रिय,
निसर्गा ,


विषय:- आजपर्यंत जे आयुष्य दिलंय त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणे बाबत....

     मी तुझ्याच पासून तयार झालेला एक जीव.ज्याला तु आकार दिला. जीवनावश्यक सर्व काही दिलं.या पृथ्वीतलावर जन्माला येणारा प्रत्येक जीव तुझ्याच मुळे हे सुंदर असं विश्व बघू शकतो. तु आहेस येवढा अद्भुत की तुझ्याकडे बघताना माणूस सर्व काही विसरून तुझाच होऊन जातो. 
तुझ्या पुढे फिके पडतात ते दु:ख. जे दुःख खुप 
यातना देतात. जे माणसाला रडवतात. जर तुझ्या प्रेमाचा विचार केला तर तु कधीच स्वतः चा स्वार्थ बघितला नाही.
 निस्वार्थी होऊन तु प्रत्येक जीवावर प्रेम करतोस. तु येवढा हद्दयस्पर्शी आहे ना, की फक्त तुझ्यात आयुष्य व्यतीत करावसं वाटतं. प्रत्येक दु:खाला दूर करण्याचे कारण तु आहे.

       निसर्गा तु येवढा शुद्ध आहे. की तुझ्या येवढी शुध्दता कशातच दिसतं नाही. तु कधीच तुझ्याकडे काही मागणाऱ्याना नाही म्हणत नाही. आजपर्यंत तु प्रत्येकाला भरभरून दिलं. आणि कोणतंही अपेक्षा न ठेवता. ज्या मानवाला तु तयार केलं त्याला का शिकवत नाही.तु कोणतीही अपेक्षा न ठेवता जगायचं. तु येवढा मनमोहक आहे ना की फक्त तुझ्या सहवासात जगावंस वाटतं. येवढं आकर्षित कसा करतोस रे. सगळं काही विसरून तुझाच व्हावंसं वाटतं कधी कधी. तुझ्या पासूनच माझी सुरूवात झाली. आणि शेवटी तुझ्यातच विलीन व्हायचं मला. तु आजपर्यंत येवढं काही दिलंय तरी त्यातलं कांहीच परत नाही मागितलं. तु खुप प्रेमळ आहेस. जो प्रत्येकाला खुप जीव लावतो. तुझी माफी पण मागावी म्हणतोय. ज्यांच्या निर्मितीचे कारण तु आहे. त्यानेच तुला नष्ट करण्याची शपथ घेतली असं वाटतंय. तरी तु त्याला जे हवंय ते देतोय. तुझ्या सारखं निस्वार्थी कोणी असेल का हा माझ्या मनात नेहमीच प्रश्न पडतो. मी तुला माझ्या आयुष्यातील दु:ख दूर करण्याचं साधनं मानतो. हो तुझ्या सहवासात राहिलं की मी सर्व काही विसरून जातो. तु आहेस म्हणून मी आहे. आणि या विश्वात असलेला प्रत्येक जीव आहे.तुझी कृतज्ञता व्यक्त करताना खरंच मनात अश्रू येतात. कोणी तुझ्या साठी का रडत नसेल. तु तर प्रत्येकाला हवंय ते देतो. मग तुझा विचार कोणी का करत नसेल. माफ कर त्या सर्वांना ज्यांना तु  सर्व काही देऊन तुला विसरले.आणि धन्यवाद तुझं तु मला हे सर्व सुंदर असं विश्व दाखवलं. जे खुप आश्चर्यकारक असं आहे.

कृतज्ञतापूर्वक
तुझाच एक अंश 
    अनिकेत शारदा श्रीराम

रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

पञास प्रेम व्यक्त करताना ..


प्रिय, 
माननीय पञ
मनातल्या भावना ,शब्दरूपी वाट 


 विषय:- प्रेमाच्या भावना व्यक्त करताना...


प्रिय पञा, 

     मी अनिकेत , तुझ्या रूपाने माझ्या भावना इतरांपर्यंत पोहचवणारा शब्दांचा वाटसरू, मला आज अचानक तुझी आठवण झाली आणि डोळे पाणावले. काय माहित पण तु मनाला खुप सुखावतो तुझ्या येण्याने मनामध्ये खुप आत्मियता जागृत होते. तुझ्या शब्दांच्या रूपांमध्ये मला माझ्या वरती प्रेम करणाऱ्या माणसाची आठवण होते. मला सुद्धा आज तुझ्यावर प्रेम जडलय. हो तुझ्या मार्फत आजपर्यंत किती तरी मनाची बंधने एकमेकांशी जोडली गेली. आणि काहींच्या सुख दुःखाच्या भावनांची तु सुध्दा दळणवळण करत आलास तुझ्या ह्या निस्वार्थी प्रेमाची साक्ष तो कागद आणि शाही सुध्दा देते. जे तुझ्या आयुष्याचे भाग आहेत. खरंच तुझ्यावर प्रेम करावसं वाटतं असा आहेस तु .मनाला आनंद देणारा, आधार देणारा, तुझ्यामुळे शब्द हे बोलके वाटायला लागतात. तुझ्यासाठी मी हे लिहतोय हे यासाठी की,आजकाल तुझं दिसणच हल्ली बंद झालंय. तुझ्या शब्दांच्या प्रेमात पडायचं मला पडशील ना माझ्या प्रेमात ? 

   मला तु सतत भेटतं रहावं असं वाटतं माझी ही इच्छा पूर्ण करशील यांची मला खात्री आहे.


तुझा प्रिय,
अनिकेत ( अनु)

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

समानता

समानता तेंव्हाच प्रस्थापित होईल.
जेव्हा लिंगभेदाच्या भिंती ओलांडून समानतेच्या तत्त्वाला धरून सर्व जण वागायला सुरुवात करतील.

सोमवार, २५ जुलै, २०२२

चिंतेला अग्नी द्यायला मुलगा हवा

आपल्या देशात खुप आधीपासून ही प्रथा आहे.की मुलगाच हा घराचा वारस असावा.आणि त्याने घरांच्यानाआधार द्यावा.तो घरातल्यांना सांभाळून शकतो.मुलगी ही तर परक्याच धन आहे.असा विचार आपल्या देशामध्ये अजुन पण कमी नाही झाला.जरी आपला देश विज्ञानवादी असला तरी पण अजुन पण देशांमध्ये सनातनी विचारांचा प्रभाव तसाच दिसून येतो.कधी त्या मुलीचा हुंड्यासाठी जीव घेतला जातो तर कधी तिचा गर्भातच तिला मारून टाकल्या जात.एकीकडे मुलगी शिकली प्रगती झाली.अशा बोंबाबोंब करणारे लोक आणि त्याचं देशात स्ञी पुरूष समानता असून पण त्या स्त्रीला तुच्छ लेखून तिला घर आणि स्वयंपाक घरापर्यंत मर्यादित ठेवायचं.हे अजुन पण कमी नाही झालं.ती शिकली मोठी झाली.पण शेवटी तिच्या नशिबी तेच जे हजारो वर्षांपासून चालत आलंय.चिंतेला अग्नी द्यायचा म्हणून मुलगा हवा या धार्मिक अंधश्रद्धेमुळे 'मुलगी' पेक्षा 'मुलगा' आपल्या समाजात हवा असतो.कुटुंबाला मुलगाच असतो यांची कारणे, सामाजिक धार्मिक तसे आर्थिक ही आहे.आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो.बहुसंख्य लोक हे शेतीवर अवलंबून आहे. व शेती करण्यासाठी सध्याच्या समाजव्यवस्थेत मुलगा आवश्यक मानल्या जातो. हुंड्या सारखा न पटणाऱ्या गोष्टी मुळे मुलगी ही नकोशी वाटते.कोणाला पण अगोदर मुलगाच हवा असतो._विज्ञान-तंञज्ञान_ यामुळे माणूस प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.पण हेच _विज्ञान-तंत्रज्ञान_ समाजात असलेले अधश्रध्द घटक, आपल्या स्वार्थासाठी व आपल्या फायद्यासाठी फायद्यासाठी त्यांचा दुरूपयोग करत आहे.गर्भलिंग निदान बेकायदेशीर असताना व त्यासाठी कडक कायदे करून पणसोनोग्राफी करणारे तज्ज्ञ डॉक्टर हे पैश्या च्या आहारी गेल्यामुळे 'मुलगा' आहे की 'मुलगी' हे सांगतात.स्वतः च्या स्वार्थासाठी व पैशांच्या मोहापायी येवढे भुकेला लागले आहे.की, त्यांना त्या चिमुकल्या लहान मुलीचा जीव काहींच वाटत नाही.कुटुंबाच्या इच्छेप्रमाणे स्ञी गर्भ ओळखला जातो. व मुलगी आहे.समजताच बेकायदेशीर रीत्या फक्त पैशांच्या च्या पायी नीच वृत्ती व मानसिकता ठेवून तिच्या घरचे व ते डॉक्टर तिचा पोटातच जीव घ्यायचा. एकीकडे आपल्याच देशात गाय मारू द्यायचीनाही ,धर्मश्रद्धेपोटी ,बोकड मारू द्यायचं नाही , जीवदया म्हणून मांसाहारी करणे चुकीचे आहे.गळ्यात माळ घालायची.आणि येवढा मोठ्या धार्मिक विचारांचे आपण आपलीच 'मुलगी' किंवा 'नातं' सोनोग्राफी करून ओळखून त्या नंतर तिचा त्या गर्भातच जीव घ्यायचा.इथे आपली मानवता, प्रेम, माणुसकी,कुठे मरून जाते काय माहित सतत लोकांना ज्ञानाच्या गोष्टी सांगणारे आपण मांसाहार करून मुक्या जनावरांचा जीव नका घेऊ म्हणून लोकांना ज्ञान देणारे आपण आपल्याच मुलींचा किंवा नाती चा गर्भातच जीव घेतो ही किती केविळवाणी गोष्ट आहे.अशा गोष्टी आपल्या भारतीय समाजाचे भीषण वास्तव आहे.स्ञी चे शिक्षण आपल्या समाजात ,विशेषतः मी खुप अनुभव घेतला या गोष्टीचा ग्रामीण भागात फार लवकर _स्ञी-शिक्षण_ हे लवकर आटोपले जाते.एका निरिक्षणात मी असं सिध्द झालं की , एकतृतियांश ग्रामीण स्ञीया आठवी इयत्तेपुढे शिक्षण घेतात असे आढळून आले आहे. या मुलींचे वय:१६-१७ व्या वर्षी लग्न लावून दिले जाते.हुंड्यासाठी खुप अशा मुलींना ञास सहन करावा लागतो. काही स्ञीया तर  फाशी देऊन किंवा त्यांचा गळा दाबून अंगावर पेट्रोल किंवा रॉकेल ओतून जीव घेतला जातो अशा बऱ्याच घटना ऐकलेल्या आहे आणि ही सगळ्यात भयानक व निशब्द करून टाकणारी दु:खत स्थिती आपल्या समोर आहे.हे एक भयानक वास्तव आपल्या समोर आहे.जिथे गर्भलिंग परिक्षणाने स्ञीचे गर्भ ओळखून, गर्भ अवस्थेत तिला खुडुन टाकण्याची व तिचा त्या गर्भातच जीव  घेण्याची पध्दत रूढ झाली. त्या देशात कधी बदल होईल अजुन पण ती मानसिकता घेऊन लोक जगत आहेत.आतापर्यंत शिक्षण घेऊन खुप मुली मोठ्या झाल्या. पण अजुन पण लोकांच्या मनांतील ती नीच वृत्ती नाही गेली.ज्या आईंच्या पोटी जन्म घेतो.व त्या आईमुळे हे जग बघायला भेटलं त्याचं आईसाठी आपल्या ला मुलगी आवश्यक आहे .असं का नाही वाटत?मुलगी झाली म्हणून दु:ख वाटते.आणि आम्ही स्ञी-पुरूष समानता पाळणारे फक्त ते नावापुरतेच मर्यादित ठेवलं.कधी त्यांचा विचार केलाच नाही.आपल्या देशात अजुन पण ही मानसिकता बदलली नाही.आता तरी बद्दल हावा हीच इच्छा..!
_#विचाराच्या _ पलीकडे_
अनिकेत शारदा श्रीराम 
सावरगाव माळ, मातृतीर्थ सिंदखेडराजा, बुलढाणा

माणूस म्हणून जगण्याचा संघर्ष !

    महाराष्ट्र माझी माय भूमी, या महाराष्ट्राच्या मातीने मला कष्ट करायला शिकवले. सत्याची कास धरून वागायला शिकवले. समानता शिकवली. माणुसकी शिकव...